मोबाईल नसता तर मराठी निबंध | Mobile nasta tar marathi nibandh

नमस्कार मंडळी,

या लेखामध्ये mobile nasta tar marathi nibandh आज आपण बघणार आहोत, मोबाईल नसता तर मराठी निबंध हा निबंध आपण मराठी भाषेमध्ये बघणार आहोत. ह्या लेखांमध्ये आपण मोबाईलचे फायदे तोटे, मोबाईल नसता तर काय झालं असतं आणि मोबाईल आहे म्हणून काय होतंय ह्याविषयी निबंध लिहिणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपला मोबाईल नसता तर मराठी निबंध.

एकदा कल्पना तर करून बघा, मोबाईल नसता तर काय झालं असतं हे जग कसं राहिलं असतं किंवा पूर्वीच्या काळात मोबाईल नव्हता तेव्हा लोक कशी राहत होती एकदा या सर्वांची कल्पना तर करा, मोबाईल असल्यामुळे आज सर्वांचे जीवन अधिक सुविधामय झालेले आहे. पण मोबाईल नसता तर काय झाले असते, या कल्पनेचा सारांश विद्यार्थ्यांनी निबंधामध्ये उतरावायचा असतो.

Table of Contents

मोबाईल नसता तर .. | Mobile nasta tar marathi nibandh

नुकताच वस्तीगृहांमधून आईला फोन लावला आणि म्हणालो आई उद्या सकाळी मी घरी परतणार आहे, दिलेल्या बातमीबद्दल आई खूप खुश झाली आणि विचारू लागली बाळा उद्या जेवणात काय बनवू, मग मी आईला म्हणालो जेवणात चमचमीत मस्तपैकी चिकन बनव, आणि फोन ठेवला. आईला झालेल्या आनंदाबद्दल अचानक मनात विचार आला मोबाईल नसता तर..

Mobile nasta tar marathi nibandh-हे किती कठीण झाले असते. म्हणजेच घरी परतण्याचा आनंद आईला एक दिवस अगोदर अनुभवायला मिळालाच नसता, बरोबर ना? आजच्या काळात संपूर्ण कामे मोबाईलवरच अवलंबून आहेत. मोबाईल वरून एकमेकांची सुखदुःखे वाटून घेता येतात. मोबाईल नसता तर mobile nasta tar माणूस संपर्क क्षेत्रामध्ये आजवर पुढे गेला नसता, मोबाईल फोन मुळे सर्वांची काळजी घेणे सुद्धा सोपे झाले आहे, जागतिक स्तरावर सुद्धा मोबाईल फोनला अधिक लोकप्रियता मिळते म्हणजेच जागतिक स्तरावर ही मोबाईल फोनची आजच्या काळात अधिक प्रमाणात गरज आहे. मोबाईल ही आजच्या काळात सर्वांचे एक मूलभूत गरज बनली आहे. जस माणूस अन्नाशिवाय पाण्याशिवाय किंवा कपड्यांशिवाय जगू शकत नाही, तसंच मोबाईल शिवाय ही जगू शकत नाही.

फॅमिली पासून लांब गेल्यावर किंवा आपल्या देशातून परदेशात गेल्यावर सहजरित्या संपर्कही करता येतो आणि ते फक्त मोबाईल मुळेच. मोबाईल नसता तर लांब केलेल्या आपल्या नातेवाईकांशी संपर्क करणे हे खूप कठीण झाले असते आणि आता हे सगळे सहज झाले आहे ते म्हणजे फक्त मोबाईल फोन मुळेच. 

मोबाईल नसता तर mobile nasta tar भूतकाळातील प्रसंगांना मिठी मारणे असे आज झाले असते, पूर्वीच्या काळातले मोबाईल म्हणजेच समोरासमोर संवाद साधने हाच एक मोबाईल होता. परंतु आजच्या काळात मोबाईल हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. परंतु तुम्हाला माहितीच असेल मोबाईल मुळे तांत्रिक जगातही अधिक प्रगती झालेली आहे. मोबाईल फोन हे एक सोय नसून एक आजच्या काळातली गरज बनली आहे. या निबंधामध्ये आपण मोबाईल नसता तर आज सर्वांचे जीवन कसे राहिले असते याचा शोध घेऊ, मोबाईल शिवाय भविष्यात आपल्यासमोर येणारी आव्हाने आणि भूतकाळातील गेलेले आपले पूर्वजांचे अनुभवांचे कौतुक या निबंधात आपण करू.

मोबाईल नसता तर मराठी निबंध | Mobile nasta tar marathi nibandh 

Mobile nasta tar marathi nibandh-पूर्वीच्या काळात एकमेकांशी संवाद करणे हाच एक मोबाईल चा हेतु होता. परंतु आजच्या आधुनिक जगात एकमेकांसमोर आपण आलो ही तरी सोशल मीडिया, मोबाईलवर येणारे मेसेजेस, वेगवेगळ्या प्रकारचे नोटिफिकेशन, ह्या सर्वांमध्येच आपण व्यस्त होतो, परंतु मोबाईल नसता तर mobile nasta tar सोशल मीडियाच्या वापरा ऐवजी एकमेकांमध्ये अधिक संवाद साधून इतरांशी संबंध वाढले असते. मोबाईल नसता तर आपल्यासमोर संवाद साधत असलेल्या व्यक्तीला आपल्याकडून सहानुभूती मिळाली असते आणि संवाद खोलवर झाला असता. पूर्वीच्या काळी अगोदर सर्वजण लँडलाईन फोन म्हणून वापरत.

mobile nasta tar compress
mobile nasta tar

मोबाईल नसता तर लँडलाईन टेलिफोन ला त्याचे पूर्वीचे महत्त्व पुन्हा प्राप्त होईल. पूर्वीच्या काळात लँडलाईन टेलिफोन हा अधिक प्रचलित होता, घरापासून दूर गेल्यावर किंवा काही कठीण परिस्थिती असल्यास लँडलाईन टेलिफोनच्या माध्यमातून संवाद साधायचे काम होत. लँडलाईन टेलिफोन हा पूर्वी एखाद्या दुकानात ठेवून तिकडे जाऊन कॉइन बॉक्स मध्ये एक रुपया टाकून एक मिनिटभर बोलता येत असत. यामुळे सार्वजनिक आणि सामाजिक परिस्थिती ही अगदी चांगली होती. लँडलाईन टेलिफोन ला पूर्वीसारखेच महत्व दिले तर आजच्या काळाने एकत्रित येण्याची गमावलेली सामुदायिकता पुन्हा आणली जाईल. Mobile nasta tar marathi nibandh या निबंधमध्ये आपण संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

मोबाईल नसता तर mobile nasta tar आधुनिक काळातले विविध व्यवसायांमध्ये अधिक अडथळे आले असते. आधुनिक काळात मोबाईल मुळे एवढी प्रगती झाली आहे की आपण कुठेही असू दे घरबसल्या जेवणातील पदार्थ, कपडे, तांत्रिक वस्तू किंवा काहीही जे आपल्याला पाहिजे आहे ते आपण मागवू शकतो, हे सर्व सहज झाले आहे ते म्हणजे मोबाईल मुळे. टीव्ही नसतानाही मोबाईल  मध्ये कुठलाही कानाकोपऱ्याची बातमी अगदी पटकन सहज आपल्यापर्यंत पोहोचते, आपली आवडती मालिका, क्रिकेट मॅच, फुटबॉल मॅच, मोबाईल नसता तर ह्या गोष्टी इतक्या झटपट झाल्याच नसत्या.

मोबाईल नसता तर .. | Mobile nasta tar marathi nibandh

Mobile nasta tar marathi nibandh-पूर्वीच्या काळात मोबाईलच्या कमतरतेमुळे व्यवसायासाठी समोरासमोर बैठक बसून संवाद साधायचे आणि यामध्ये व्यवसायासंबंधीत झटपट उत्तरे द्यायला कठीण जायचे. मोबाईल नसता तर mobile nasta tar कर्मचाऱ्यांना आपापली दिलेली कामे वेळेवर पूर्ण करता आले असते. मोबाईल नसता तर कर्मचारी सोशल मीडियावर न गुंतता आपापली कामे झटपटपणे पार पाडू शकले असते. मोबाईल नसता तर प्रवासाची माध्यमे बस, रेल्वे, विमान, जहाज अशी अनेक वाहनांची घरबसल्या बुकिंग आपल्याला करता आली नसती आणि यामुळे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला रांगेमध्ये तासान तास उभे राहून आपला किमती वेळ गमवावा लागला असता. मोबाईल मुळे घरबसल्या कुठल्याही प्रवास माध्यमातून तिकीट काढून आपला प्रवास आपण सुरळीत बनवू शकतो. मोबाईल नसता तर  लहान मुलांमध्ये खेळ खेळण्याची क्षमता ही पूर्वीसारखीच राहिली असती.

मोबाईल नसता तर mobile nasta tar वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचायला वेळ दिला असता, मोबाईल नसता तर आपल्या मोबाईल मध्ये असलेली आपली महत्त्वाची माहिती कोणास समजली नसती याचे कारण असे की आजच्या आधुनिक काळात आपली सर्व गोपनीयता जसे की बँकेचे व्यवहार, आपण कुठल्या स्थानावर आहोत, आपले  वैयक्तिक फोटो, मोबाईल मध्ये असलेला महत्त्वाचा डाटा चोरीला जाऊन याचा गैरवापर झाला नसता.

मोबाईल नसता तर .. | Mobile nasta tar marathi nibandh

मोबाईल नसता तर परिवारातील सदस्य एकमेकांसोबत वेळ घालवतील, गप्पागोष्टी करतील. मोबाईल नसता तर लहान मुले मोबाईल बघून न जेवण करता आईच्या हाताने आनंदाने जेवण करतील, मोबाईल नसता तर पूर्वीसारखे लहान मुले आजी-आजोबांच्या कुशीत जाऊन वेगवेगळ्या प्रकारची कहाणी ऐकून झोपी जातील परंतु मोबाईल मुळे लहान मुले कार्टून व्हिडिओ बघता बघताच झोपी जातात. मोबाईल नसता तर mobile nasta tar लहान मुले पहिल्यासारखेच मैदानावर जाऊन विविध प्रकारची खेळ खेळतील, मोबाईल नसता तर जी लोक अपडेट सोशल मीडियावर संपूर्ण वेळ व्यस्त असता ती लोक एकमेकांच्या संपर्कात येऊन अधिक संवाद साधतील.

मोबाईल नसता तर अपघाताचे प्रमाणही कमी होईल काही लोक गाडी चालवत असताना रस्त्या वरच मोबाईल वर बोलत असता, काही गाडी चालवत असताना सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघत असता आणि यामुळे अपघातही वाढले आहेत, मोबाईल नसता तर अपघाताचे ही प्रमाण कमी होईल. मोबाईल नसता तर सोशल मीडियावर असणारे अश्लील व्हिडिओ आणि ब्लॅकमेलिंगचेही प्रमाण कमी होईल. 

Mobile nasta tar marathi nibandh-मोबाईल नसता तर आजच्या जगात डिजिटल गोष्टींना कमी प्राधान्य मिळाले असते, पण मोबाईल असताना झालेल्या सर्व डिजिटल गोष्टींमध्ये आपल्याला याचा फायदाही मिळतो आहे तो म्हणजे रस्त्यावर कुठे अपघात झाला असेल तर आपण लगेच मोबाईल फोन द्वारे ॲम्बुलन्सला बोलवून अपघात झालेला व्यक्तीस उपचाराकरिता पाठवू शकतो, किंवा कुठेही काही भांडण तंटे चालू असल्यास पोलिसांना फोन करून याची बातमी देऊ शकतो, मोबाईल नसता तर mobile nasta tar ह्या सर्व गोष्टी आपल्यासाठी कठीण झाल्या असत्या.

मोबाईल नसता तर .. | Mobile nasta tar marathi nibandh

मोबाईल नसता तर mobile nasta tar आपत्कालीन सुविधांशी संपर्क करणे अधिक कठीण झाले असते. मोबाईल फोन मुळे आपल्या जीवनात आलेल्या असंख्य चांगल्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही मोबाईल फोन नाही आपली कार्यक्षमता अधिक चांगल्या प्रमाणे बजावले आहे. आधुनिक काळात बऱ्याच लोकांना मोबाईलचे व्यसनच लागले आहे परंतु मोबाईलचा वापर कसा करावा हे आपल्यावर अवलंबून आहे. मोबाईलचा वापर योग्यरित्या केल्यास आपल्याला त्याचे चांगले परिणाम जाणवते अथवा मोबाईलचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी किंवा अधिक सोशल मीडियाच्या वापरासाठी केला तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला जाणवतील. 

मोबाईल नसता तर mobile nasta tar इंटरनेटवर लहान मुलांनी अधिक वेळ गेम खेळून आपले बालपण यात वाया घालवले नसते. आधुनिक जगात बरेच विद्यार्थी मोबाईलचा वापर करून शिक्षण घेत आहेत, मोबाईल नसता तर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या संवादाखाली योग्यरीता उत्कृष्ट असे शिक्षण घेतले असते. बातम्यांमध्ये आपण बघितलंच असेल की शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे मोबाईल फोन द्वारे निघणारे रेडिएशन मानवी शरीराला किंवा प्रत्येक सजीव प्राण्याला हानिकारक आहेत. हजारो पक्षांचा मृत्यू मोबाईल द्वारे निघणाऱ्या रेडिएशनमुळे होतो. मोबाईल नसता तर सुमारो हजारो पक्षांचा मृत्यू झाला नसता. 

मोबाईल नसता तर .. | Mobile nasta tar marathi nibandh

मोबाईल फोन नसता तर नातेसंबंधांमध्ये अधिक सखोलता निर्माण झाली असती. मोबाईल नसता तर mobile nasta tar भूतकाळाची आठवण करताना भविष्यकाळातील आव्हाने, मोबाईलद्वारे झालेले कार्यक्षमता, तंत्रज्ञानाचा फायदा, डिजिटल सुविधा हे सर्व बघत असताना भविष्यकाळात पदार्पण करणे योग्य ठरेल. परंतु मोबाईल मुळे असंख्य घटना घडतच राहतील परंतु हे आपल्यावर अवलंबून आहे की मोबाईलचा वापर आपण कसा करत आहोत. यासाठी मोबाईलचा वापर अधिक चांगल्या गोष्टींसाठी करा आणि समाजामध्ये प्रगती घडवून आणा. 

तर मित्रांनो Mobile nasta tar marathi nibandh या निबंधामध्ये आपण संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ 

भारतात पहिला मोबाईल कधी लॉन्च झाला?

भारतात मोबाईल फोन 22 ऑगस्ट 1994 रोजी मोबाईल लॉन्च झाला. ज्या वेळेस भारतात पहिला मोबाईल फोन लॉन्च झाला तेव्हा त्या मोबाईलची किंमत सुमारे 45000 होती आणि सतरा रुपये प्रति मिनिट बोलण्याचे स्वरूप होते. 

जगातील पहिला मोबाईल फोन कधी केला गेला कोणी कॉल केला?

मोटोरोला येथील मार्टिन कुपर अभियंता याने 3 एप्रिल 1973 रोजी पहिला सार्वजनिक कॉल केला. पहिला मोबाईल कॉल हा 1973 मध्ये करण्यात आला होता. पुन्हा कॉलनी मानवी जगातील पूर्ण दुनियात बदलून टाकली. ह्या कॉल साठी 3.2 लाख रुपये आणि बोलण्यासाठी 50  सेंट प्रति मिनिट एवढा खर्च आला होता. 
अधिक माहितीसाठी मोबाइल चे फायदे आणि तोटे या विषयावर मराठी डिलाइट मध्ये लिहिलेला हा लेख नक्की वाचा.

प्रत्येकाकडे सेल फोन आहे का?

आजच्या काळात सेल फोनचा वापर एवढा वाढला आहे की, आजच्या आधुनिक काळात 95 टक्के लोकांकडे सेलफोन आहे. 

स्मार्टफोन आवश्यक आहेत का?

आधुनिक काळातील गरजेनुसार स्मार्टफोनची आवश्यकता ही आपत्कालीन परिस्थितीसाठी जसे की अपघातग्रस्त लोकांसाठी किंवा मग लांब असलेल्या नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी, मनोरंजन क्षेत्रासाठी स्मार्टफोन हा आवश्यक आहे.

पहिला फोन कसा चालला?

पहिला फोन हा सुई  बॅटरी ला जोडलेली होती आणि बॅटरी रिसिव्हरला जोडलेली होती, त्यावेळेस  बेल ड्रम सारख्या यंत्राच्या उघड्या टोकामध्ये बोलू पावला आणि त्याच्या आवाजाने कागदाने सुई कंप पावली आणि त्यानंतर कंपणाचे विद्युत प्रवाह रूपांतर होते जे वायरच्या बाजूने रिसिवर कडे जात होते, अशा प्रकारे पहिला फोन चालला.  

आयपी पत्ता वापरून मी माझा हरवलेला फोन कसा शोधू शकतो?

GPS ट्रेकिंगच्या सिस्टमच्या सहाय्याने IP पत्त्यासह फक्त भौगोलिक स्थान किंवा शहर अचूक दिसू शकते. 

सेल फोनची ऑपरेशनल व्याख्या काय आहे?

सेल्युलर फोन है एक दूरसंचार असे उपकरण आहे, जे नेटवर्क असलेल्या भागावर रेडिओ लहरी वापरते आणि सेल लाईट किंवा बस स्टेशन द्वारे एका ठराविक स्थानावर सेवा दिली जाते.  

मोबाईल फोन नसता तर काय झाले असते निबंध?

शास्त्रज्ञांची मान्य आहे की दरवर्षी सुमारोप हजारो पक्षी मोबाईलच्या रेडिएशनमुळे मृत्यूमुखी पावतात. मोबाईल फोन नसता तर हजारो पक्षांचा जीव आपण वाचवू शकलो असतो. मोबाईल नसता mobile nasta tar तर लहान बालके जी कार्टून बघून झोपी जातात ती आई-बाबांच्या कहाण्या ऐकून झोपली असती. मोबाईल नसता तर वाहन चालत असताना मोबाईलचा वापर करत असलेले तरुण अपघाती मृत्यू पावले नसते. मोबाईल नसता तर रस्त्यावरचे अपघातही बऱ्याच प्रमाणात कमी झाले असते. मोबाईल नसता तर अश्लील व्हिडिओ आणि त्याच्याने ब्लॅकमेलिंग चे प्रकार अधिक वाढले आहे, हे झाले नसते.

साध्या शब्दात मोबाईल फोन म्हणजे काय?

साध्या शब्दात मोबाईल म्हणजे वायर नसलेले एक हँडसेट हातामध्ये धरता येणारे एक उपकरण आहे. मोबाईल फोन म्हणजे परिवारापासून लांब केलेल्या आपल्या जवळच्या लोकांशी अधिक सहजतेने संवाद साधता येणारे एक चालते फिरते उपकरण आहे. पूर्वीच्या काळी मोबाईल फोनवर फक्त कॉल करू शकत होतो परंतु आजच्या आधुनिक युगात मोबाईल फोन द्वारे आपल्याला व्हिडिओ गेम, फोटो, चित्रपट, बातम्या अशा काही गोष्टी अगदी सेकंदात प्राप्त करू शकतो.

मोबाईल फोनचा शोध लागला नसता तर?

मोबाईल फोनचा शोध लागला नसता तर mobile nasta tar आजच्या आधुनिक युगातल्या डिजिटल गोष्टींचा अनुभव आपल्याला घेता आला नसता. मोबाईल फोनचा शोध लागला नसता तर एकमेकांपासून लांब गेल्यावर जलद गतीने संवाद साधता आला नसता. मोबाईल फोनचा शोध लागला नसता तर आजच्या काळात ज्या गोष्टी अधिक सहज होत आहे त्या गोष्टी अधिक कठीण स्वरूपात आपल्याला प्राप्त झाल्या असत्या. 

मोबाईल फोन शिवाय तुम्ही तुमच्या आयुष्याची  कल्पना करू शकता का?

मोबाईल फोन शिवाय मी कल्पना करू शकते की पूर्वीच्या काळी कसे आयुष्य असेल, पूर्वीच्या काळी घरापासून कोणी लांब गेल्यावर पत्रामार्फत किंवा एखाद्या चिठ्ठीमार्फत त्या व्यक्तीशी बोलले जात होते. मोबाईल mobile nasta tar फोन शिवाय आपल्या आयुष्य अधिक गुंतागुंतीचे होईल आणि आपले मित्र किंवा परिवारातील लांब गेलेल्या सदस्यांपासून त्यांच्याशी संवाद साधायला आपल्याकडे कोणतेही उपकरण नसेल.

मोबाईल ला काय म्हणतात?

मोबाईलला सेल फोन असेही म्हटले जाते, सेल फोन म्हणजेच भ्रमणध्वनीच्या सहाय्याने एकमेकांमध्ये केलेले संभाषण आणि त्या माहितीची केलेली देवाणघेवाण या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून अधिक सहजरीत्या पार पडते..

भारतातील सर्वोत्तम मोबाईल नेटवर्क कोणते आहे? 

येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारतात फक्त जिओ आणि एअरटेल हे सर्वाधिक वापरले जाणारे नेटवर्क असणार आहे. सध्या दूरसंचार क्षेत्रामध्ये एअरटेल आणि जिओ ह्या दोघी नेटवर्कचा सर्वीकडे दबदबा दिसून येत आहेत. एअरटेल आणि जिओ मध्ये ही जिओच्या नेटवर्कला भारतामध्ये अधिक प्राधान्य मिळताना दिसत आहे. आजच्या परिस्थितीला जिओ हे नेटवर्क एक नंबर स्थानावर आहे. दूरसंचार क्षेत्रामध्ये एअरटेल आणि जिओ या दोन्ही नेटवर्कनेच फक्त 5G सेवा भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील अनेक लोक आयडिया, वोडाफोन, बीएसएनएल अशी क्षेत्र सोडून जिओ आणि एअरटेलला अधिक प्राधान्य देत यामध्ये समावेश करत आहेत. येणाऱ्या पुढच्या परिस्थितीमध्ये जिओ आणि एअरटेल हे दोन्ही नेटवर्कच टिकतील का? हा प्रश्न देखील सर्वांसमोर येऊन उभा आहे. 

Leave a Comment