साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा हा सण..

या सणाच्या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा आहे.

डॉक्टरांच्या मते कडुलिंब आणि गुळाचे सेवन करणे अधिक चांगले आहे.

कडुलिंब आणि गुळामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे आपले सौंदर्य आणि आरोग्य टिकवून ठेवते.

आयुर्वेदानुसार चैत्र महिन्यापासून हवामानात बरेचसे बदल होताना आपण बघतो.

बदलत्या वातावरणामुळे विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते आणि या..

आजारांपासून बचाव करण्यासाठी कडूलिंब आणि गुळाचे सेवन गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाते.

गुळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कडूलिंब खाल्ल्याने त्वचे संबंधित आजार,मधुमेह आणि अजून बरेच आरोग्य संबंधित धोके टाळले जातात.

कडुलिंब आणि गुळाचे सेवन केवळ गुढीपाडव्याच्या सणानिमित्त नव्हे तर वर्षभर कडुलिंबाची कोवळी पाने आणि थोडासा गूळ नियमित खात राहा आणि आजारांना दूर पळवा.

गुढीपाडव्याला गुढी का उभारली जाते? काय आहे खरे कारण?